कांदा बीज ऊत्पादनातून वाहेगांवच्या शेतकऱ्याची ऊत्तुंग भरारी
छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाहेंगावचे शेतकरी अनिल मनाळ गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय करतात.
शेतीच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर कांदा बीज शेतीमुळे नामलौकीक केला आहे.
गेल्या काही वर्षात त्यांनी कांदा बीज ऊत्पादनाच्या माध्यमातीन शेतकऱ्यांसाठी ऊत्पादन वाढीबाबत कार्यशाळा घेतल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जात त्यांनी कांदा ऊत्पादनासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचे जिवनमान ऊंचविण्यासाठी त्यांनी काम केले आहे.
याच कामाची दखल घेऊन ,अनिल मनाळ यांना बिंदास फाऊंडेशन व बिंदास माध्यम समूहाकडून ऊत्कृष्ट बिंदास शेतकरी या पुरस्काराने सपत्नीक सहपरीवार सन्मानित करण्यात येणार आहे.

सपत्नीक ,सहपरीवार, गुरूवर्य महंत रामगिरीजी महाराज, महंत गुरूवर्य नारायणानंदजी सरस्वती महाराज,बालगिरीजी महाराज,महेंद्रगिरीजी महाराज, पालकमंञी संजय शिरसाठ ,खासदार संदिपानजी भुमरे,विधान परीषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, डॉ भागवत कराड, कार्यसम्राट आमदार प्रा रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगांवकर, संघर्षकन्या संजवाताई जाधव, डॉ दिनेश परदेशी, प्रभाकरराव शिंदे, डॉ जिवन राजपूत, साबेरभाईं यांच्या प्रमुख उपस्थितीत बिंदास माध्यम समूहाचे संस्थापक, संपादक व बिंदास फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण पाटील भाडाईत यांच्या संकल्पनेतून अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.